पाथर्डी :

भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी येथे कुस्तीच्या फडाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी गोकुळ दौंड यांचे भाषण झाले. भाषणामध्ये त्यांनी पक्ष आणि राजकारण सोडून गोरगरिबांच्या हिताची व ऊस तोडणी कामगाराच्या समस्येबद्दल वक्तव्य केले. त्यांनी आपल्या भाषणात कारखानदार आणि राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांवर कडाडून टीका केली. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की एकदा निवडणुका झाल्या नंतर गोरगरिबांचे काय चालले आहे कोणत्याही नेत्यांना आठवणी येत नाहीत. निवडणूक महिना-दोन महिन्यावर येऊन ठेपतात तेव्हा मात्र या राजकीय नेत्यांना सर्वांचे दहावे, श्राद्ध, लग्न, सत्यनारायण, जागरण गोंधळ सगळ्या गोष्टी आठवतात. मग मात्र राजकीय लोक गोरगरिबांच्या माती ठेवत नाहीत. कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही तर सर्व राजकीय पुढार्‍यांचे कर्तुत्व त्यांनी जनतेसमोर त्यांनी मांडले. स्वतः एका राजकीय पक्षाचे उपाध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी राजकीय लोकांची सत्यता प्रकटपणे आपल्या भाषणातून व्यक्त केली, राजकारणात मला कोणी सहकार्य करेल ना करेल परंतु मी मात्र सदैव गोरगरीब आणि ऊस तोडणी कामगाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, गोरगरिबाबद्दल, ऊस तोडणी कामगाराबद्दल व शेतकऱ्या बद्दल असलेली तळमळ त्यांनी व्यक्त केली.प्रसंगी गोकुळ दौंड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व कार्यक्रमाची उपस्थिती म्हणूनआदी उपस्थित होते

प्रतिनिधी :- मधुकर केदार

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!