पुणे :

आणे पठाभागावरील आणे आनंदवाडी नळवणे शिंदेवाडी पेमदरा गावांची कायमस्वरुपी अवर्षण प्रवण परिस्थितीचा विचार करता या गावांमधील शेतीसाठी फक्त पावसावर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे सतत दुष्काळाला सामोरे जावे लागते.


येथील पीक पद्धती व दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळी-मेंढीपालन,इत्यादी व्यवसायांमध्ये उत्पन्नाची शाश्वती नाही त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाने निराशेच्या गर्तेत अडकलेला आहे.येथील पठार विकास संस्थेच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन,दिनांक २०नोहें पासून साखळी उपोषण व दिनांक २३ नोहें पासून आमरण उपोषण पुकारले होते.या आंदोलनात सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, येथील जनमनातील आक्रोश,पाण्याची त्यांना असलेली नितांत गरज लक्षात घेऊन पठार भागावरील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात कुकडी प्रकल्पाचे होणाऱ्या जलनियोजनात इतर योजनांबरोबरच आणे पठारभागासाठी उपसा जलसिंचन योजनेचा निश्चितपणे समावेश करण्यात येईल,असे आश्वासन कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता डॉ.श्री.हेमंत धुमाळ साहेबांनी शिष्टमंडळास दिले.यावेळी अधिक्षक अभियंता श्री.सांगळे साहेब,कार्यकारी अभियंता श्री.धोडपकर साहेब,उपविभागीय अभियंता श्री.विलास हांडे साहेब उपस्थित होते.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!